गरवारे कम्युनिटी सेंटर, गरवारे बाल भवन, छत्रपती संभाजी नगर जिल्हा योग संघटना आणि राधेश्याम एज्युसोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...भव्य सांघिक सूर्यनमस्कार स्पर्धा - 2026
सप्रेम नमस्कार, आम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, योगासने आणि सुदृढ आरोग्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर सिडको तसेच वाळूज येथे भव्य 'सांघिक सूर्यनमस्कार' स्पर्धांचे (१ ली ते ४ तसेच ५वी ते९ वी)आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक: 11,12,13,14 फेब्रुवारी 2026
🕘 वेळ: सकाळी ठीक 9:00 वाजता स्पर्धा संपन्न झाल्या.
📍 स्थळ: गरवारे कम्युनिटी सेंटर, एन-7, सिडको, गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूज, हनुमान मंदिर वाळूज छत्रपती संभाजीनगर.
वाळूज व सिडको मिळून दोन हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.
आयोजक:
१. गरवारे कम्युनिटी सेंटर
२. छत्रपती संभाजी नगर जिल्हा योग संघटना
३. राधेश्याम एज्युसोशल फाउंडेशन
राधेशाम एज्युसोशल फाउंडेशन तथा विवेकानंद केंद्र कन्याकुमारी या संस्थांच्या वतीने संस्थेच्या कार्यात सक्रिय असलेल्या प्रतिनिधींच्या मुला-मुलींना जे दहावी किंवा बारावी इयत्तेत शिकत आहेत त्यांना परीक्षे निमित्त प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यात आल्या.
भेट संचात पुढील बाबी आहेत:
👉🏽परीक्षे पूर्वीची तयारी, परीक्षा सभागृहात करायची तयारी, विविध विषयांच्या आदर्श उत्तरपत्रिका कश्या असाव्यात?? याबद्दल मार्गदर्शक पत्रक या संचात आहे तसेच सुंदर असा पेन देखील आहे.
👉🏽 अमृत परिवार संकल्पना मांडलेले पत्रक यात आहे.
👉🏽 मराठी भाषेला मिळालेला अभिजात राजभाषा हा दर्जा मिळाल्या बद्दल कुटुंबातील प्रत्येकाने जीवन उपयोगी अश्या सत्तावीस विषयांवरील मार्गदर्शक असलेल्या एक ओवी जीवन घडवी या पुस्तकातील नित्य एक ओवी अर्थासह लिहून काढण्याचे आवाहन पत्रक पुस्तकासह यात आहे.
👉🏽 समर्थांचे व्यवस्थापन याविषयी चे एक रंगीत पत्रक देखील यात समाविष्ट आहे.
स्वसंरक्षण (नियुद्ध) कार्यशाळा
नियुद्ध म्हणजे निशस्त्र युद्ध..... कोणत्याही प्रकारचे शस्त्र अस्त्र न वापरता फक्त हात आणि पाय यांचा उपयोग करून समोरच्याला कमीत कमी इजा करून स्वतःचे रक्षण करणे म्हणजे नियुद्ध...
👉🏽आजच्या धावपळीच्या आणि असुरक्षित वातावरणात नियुद्ध ही केवळ युद्ध कला नसून जीवन जगण्याची कला आहे. युवक युवतींनी नियुद्ध शिकल्यास ते शारीरिक दृष्ट्या सक्षम , मानसिक दृष्ट्या स्थिर आणि सामाजिक दृष्ट्या जबाबदार नागरिक बनू शकतात.
👉🏽स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त. नियुद्ध हे स्त्रियांना कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बलापेक्षा तंत्र, वेळ आणि अचूक हालचालींवर आधारित असल्याने हे अधिक प्रभावी ठरते.
👉🏽पारंपरिक भारतीय वारश्याचे जतन - नियुद्ध ही भारताची प्राचीन युद्धकला आहे. ती शिकणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान जपणे होय.
२५ जानेवारीला (रविवारी) राधेशाम एज्युसोशल फाउंडेशनच्या वतीने वय वर्षे 13 ते 45 वर्षे या वयोगटासाठी स्वसंरक्षणासाठी नियुद्ध कार्यशाळा संपन्न झाली.
छत्रपती संभाजीनगर मधील विविध भागातून सुमारे ७८ युवा किशोर यांनी सहभाग नोंदवला. राधेशाम फाउंडेशनच्या २७ प्रतिनिधींनी यासाठी विशेष मेहनत घेतली.
कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी श्री दयाल सिंग, सौ उर्मिलाजी उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून गरवारे कम्युनिटी सेंटर चे संचालक श्री सुनीलजी सुतवणे होते तसेच श्री गणेश व सौ प्रविणा खुदभैय्ये उपस्थित होते.
१. 10 वी,12 वी, डॉक्टर, इंजिनिअर, IIT, आर्किटेक्ट, एम.सी.ए.वकिली परीक्षा पास झालेल्या 32 यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
२. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी आदरणीय पंडित विश्वनाथ दाशरथे, प्रमुख अतिथी म्हणून खास पुण्याहून आलेल्या आदरणीय सुनीताताई चिंचोलकर, व गुवाहाटी येथे प्राध्यापक असलेल्या आदरणीय डॉ. अपर्णा ताई गोस्वामीजी होत्या.
३. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण होऊन समर्थ रामदास स्वामी रचित श्लोकाचे पठण तसेच महापुरुषांचा व भारतमातेचा जयघोष करून झाली. त्यानंतर संस्थेत कार्यरत असलेल्या लहान मुलांनी उत्कृष्ट स्फूर्तीगीत गात उत्साह वाढवला.
4. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना राधेश्याम एज्युसोशल फाउंडेशन चे प्रतिनिधी श्री मकरंद लेहकर यांनी संस्थेचा या कार्यक्रमा मागील उद्देश सांगताना सांगितले की, या सर्व विद्यार्थ्यांनी आपापले करियर करताना जिद्द, प्रमाणिक प्रयत्न व मेहनत करत अधिकाअधिक यशस्वी तर व्हावेच पण हे होताना आपला समाज, देश , संस्कार विसरता कामा नये. या सर्वांना जोडून ठेवण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून online एकत्रीकरण, तसेच करियर करत असताना त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तिची भेट व मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा मानस आहे असे सांगितले.
५. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा संपन्न झाला. सन्मानित विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, विविध विषयक संस्कारक्षम पुस्तके, भेटवस्तु व दंड अशी अनोखी भेट देण्यात आली.
६. सूत्रसंचालक म्हणून सौ. श्रद्धा शुक्ल व सौ. सोनाली पवार यांनी काम केले. तर सौ सुवर्णा जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
७. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व प्रतिनीधींनी महिनत घेतली. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रात काम करणारे संस्थेचे प्रतिनिधी सहपरिवार उपस्थित होते.
८. अल्पोपाहार घेऊन सर्वांना पेढे वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.
कुमार, किशोर, तरूण यांचे मन, मेंदू व मनगट बळकट व्हावे म्हणून छत्रपती शिवराय, गुरू गोविंदसिंह, समर्थ रामदास स्वामी तथा स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भारतभूमीत जन्म घेऊन संपूर्ण जीवन यासाठी अर्पित केले. या थोर विभूतींना आदर्श मानून २००५ पासून ७-८ तरूणांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रात विविध प्रकारे कार्याची सुरुवात केली. आपण करावे । करवावे । आपण विवरावे । विवरवावे । दा. १९-१०-१७ या नियमाला अनुसरून कार्य चालू झाले व आज या बीजाचे एका रोपटयात रूपांतर झाले असून "राधेशाम एज्युसोशल फाऊंडेशन" या नावाने नोदंणीकृत संस्था म्हणुन कार्यरत आहे.
Look More